पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवन कि अगरबत्ती

इमेज
इस संसार कि हर चीज हमे कुछ ना कुछ सिखाती है. हमे सिर्फ चाहिए एक खोजी नज़र. चलो देखे एक अगरबत्ती हमे क्या बता रही है: अतीत है राख, अब वहां खुशबु कि गुंजाईश नही भविष्य है अज्ञात अंधकार, जहां रोशनी अभी पहुंची नही वर्तमान है  जिवंत, जलता पल, संभावनाओ से ओतप्रोत अतीत का दामन पकड के रखोगे तो जीवन मे सिर्फ राख के हकदार बनोगे भविष्य कि चिंता और तयारी में मशगुल रहोगे तो अंधकार में जीवन बीत जायेगा   वर्तमान में जीनेवाला व्यक्ती हि केवल जीवन कि खुशबु का हकदार होता है

चुरगाळलेले पुस्तक

मागच्या आठवड्यात रेल्वे प्रवासात होतो, पुण्याहुन अमरावतीला जात होतो. सर्व प्रवाशी स्थिर स्थावर झाले, आपापल्या कोशात घुसले किंवा घुसण्याच्या प्रयत्नात होते. मी पण तसाच आहे, एकतर पुस्तक वाचत बसायचं किंवा खिडकीतुन बाहेर बघत बसायचं.  सहसा मी लगेच मिसळत किंवा बोलत नाही. पण यावेळी माझ्याकडे पुस्तक पण नव्हते आणि खिडकी पण दुर होती. बाजुच्या माणसाची थोडी विचारपुस चर्चा केली व मग नंतर शांत बसुन लोकांना न्याहाळत होतो. एक सहप्रवाशी गृहस्थ होते, त्यांनी एक पुस्तक बाहेर काढले, बहुदा त्यांना पण वाचनाची आवड असावी. आणि त्यांनी चष्मा वगैरे लावुन पुस्तक वाचायला सुरु केले. मी पण एक पुस्तक वेडा असल्यामुळे, वाचणाऱ्याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. पण त्या पुस्तकाकडे बघुन मात्र मी गोंधळुन गेलो. पुस्तकाची अवस्था वाईट होती. अगदी चुरगाळलेल्या अवस्थेत दिसत होतं. ठिकठिकाणी पानं दुमडलेली होती. विचार केला हि अवस्था का झाली असावी, अनावधानाने पिशवीत कोंबल्या गेलं असेल का? पण मग पानं का दुमडली आहेत? साठीतले छान इस्त्री केलेला सदरा विजार घातलेले ते गृहस्थ मन लावुन पुस्तक वाचत होते. मला वाटलं त्यांच्या घरी नक्कीच कोणीतरी

चित्रपट समीक्षा - 'सैराट'

इमेज
मी सैराट बराच उशीरा म्हणजे आत्ता बघितला. काही ना काही कारणास्तव तो बघायचा राहूनच गेला. आणि ह्या सहा महिन्यात दूरचित्रवाणी वर त्याच्या गाण्यांची आणि दृश्यांची इतकी उजळणी होऊन चुकली होती कि वाटलं होतं आता आणखी काही उरलं असेल का बघायला. पण बघायला मजा आली. दिग्दर्शन, संवाद लेखन आणि पात्रांची निवड यामध्ये चित्रपट पुर्ण गुण मिळवुन जातो. कथा छोटी आणि यापुर्वी बरेचदा सांगितल्या गेलेली आणि बघितल्या गेलेली. त्यामुळे इतर बाजुंवर दिग्दर्शकाने बरीच मेहनत घेतली हे दिसुन येतं. अजय अतुल यांनी परत एकदा जादु दाखवली आणि चित्रपटाला संगीत चित्रपट हा दर्जा लाभला. फँड्री नंतर त्याच कथेतला एक दुवा पकडुन अत्यंत सफल रीत्या हि प्रेम कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात नागराज मंजुळे यांना यश आलं आहे. रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी पदार्पणात केलेल्या कामगिरीची कमाल वाटत राहते. उत्तरार्धात मात्र चित्रपट थोडा भरकटल्या सारखा झालाय. कथेत जरी नाही तरी दिग्दर्शनात नक्कीच. आणि त्याचमुळे उत्तरार्ध लहान असुनही थोडा रेंगाळलेला वाटतो. परश्या आणि आर्चीचा वास्तवाशी सामना आणि अस्तित्वासाठी संघर्ष उलगडुन