मागच्या आठवड्यात रेल्वे प्रवासात होतो, पुण्याहुन अमरावतीला जात होतो. सर्व प्रवाशी स्थिर स्थावर झाले, आपापल्या कोशात घुसले किंवा घुसण्याच्या प्रयत्नात होते. मी पण तसाच आहे, एकतर पुस्तक वाचत बसायचं किंवा खिडकीतुन बाहेर बघत बसायचं. सहसा मी लगेच मिसळत किंवा बोलत नाही. पण यावेळी माझ्याकडे पुस्तक पण नव्हते आणि खिडकी पण दुर होती. बाजुच्या माणसाची थोडी विचारपुस चर्चा केली व मग नंतर शांत बसुन लोकांना न्याहाळत होतो. एक सहप्रवाशी गृहस्थ होते, त्यांनी एक पुस्तक बाहेर काढले, बहुदा त्यांना पण वाचनाची आवड असावी. आणि त्यांनी चष्मा वगैरे लावुन पुस्तक वाचायला सुरु केले. मी पण एक पुस्तक वेडा असल्यामुळे, वाचणाऱ्याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. पण त्या पुस्तकाकडे बघुन मात्र मी गोंधळुन गेलो. पुस्तकाची अवस्था वाईट होती. अगदी चुरगाळलेल्या अवस्थेत दिसत होतं. ठिकठिकाणी पानं दुमडलेली होती. विचार केला हि अवस्था का झाली असावी, अनावधानाने पिशवीत कोंबल्या गेलं असेल का? पण मग पानं का दुमडली आहेत? साठीतले छान इस्त्री केलेला सदरा विजार घातलेले ते गृहस्थ मन लावुन पुस्तक वाचत होते. मला वाटलं त्यांच्या घरी नक्कीच कोणीतरी